चक्री वादळामुळे बत्ती गुल, तळवली दांड वाडीतील घरांचे व समाजमंदिर यांचे मोठे नुकसान

पाताळगंगा न्युज                                          तळवली दांड वाडी  ५  जून, 

                    काल झालेल्या चक्री  वादळाने नागरिक चांगलेच हादरले असून या चक्री वादळामुळे तळवली दांड वाडी येथिल सात घरांचे व समाजमंदिर यांचे मोठे नुकसान झाले.ही बाब निदर्शनास येताच तळवली येथिल सामाजिक कार्यकर्ते अतुल मालकर  यांनी तातडीने या वाडीमध्ये भेट देवून पंचनामे करावयास सांगितल्यांने.या वादळांची तीव्रता खूप असल्यामुळे घराचे कौल,तसेच पत्र्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यांचे पहावयास मिळाले. यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडला आहे.त्याच बरोबर काही ठिकाणी बत्ती गुल झाल्यांचे चित्र निर्माण झाले आहे.
                 

                  घर बांधताना प्रत्येकांनी पैश्याची थोडी बचत करुन घर बांधले. मात्र चक्रीवादळाने सर्व काही हिरावून घेतले आहे. कोरोना सारख्या संकटातून सावरत असतांना चक्री वादळाने दिलेल्या तडाक्यामुळे  घरांचे नुकसान झाले आहे.मात्र पंचनामे करुन सुद्धा हवी तेवढी रक्कम मिळतच नाही.जून महिन्यातील पहिला पाऊस हा नागरिकांच्या मुळावर उठत असल्याचे चित्र दर वर्षी पहावयास मिळत असते.मात्र असे असले तरी सुद्धा निसर्गाच्या या चक्रला कोणीही थांबवू शकत नसल्यामुळे प्रत्येक जण त्यांच्या पुढे हतबल होत आहे. 
                   चक्री वादळामुळे मोठ्याप्रमाणावर वित्त हानी झाल्यांचे समोर आली  यामध्ये  दत्तु कमल्या वाघे,रामदास अर्जुन पवार,शंकर चंदर पवार,सखाराम गोविंद जाधव,मंजुळा गणेश कातकरी,लक्ष्मी विठोबा जाधव,हर्षदा राकेश जाधव या घरांचे तसेच समाज मंदिर यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे नुकसानीचे तातडीने पंचानामे करण्यात आले.असून  नुकसान भरपाई कधी मिळेल याकडे या कुटुंबाचे लक्ष लागले आहे.



चौकट :
       जुन महिन्यातील चक्रीवादळ झाले असून अनेकांचा संसार उघड्यावर आले आहे, तळवली दांडवाडी येथिल झालेल्या घरांच्या नुकसाने समजताच तातडीने तलाठी यांच्याशी संपर्क करून नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करण्यात आले. ( अतुल मालकर  सामाजिक कार्यकर्ता -  तळवली )


चौकट  :
         तळवळी दांड वाडी येथे चक्री वादळामुळे सात घरांचे तसेच समाज मंदिर यांचे नुकसान झाले असून आम्ही त्या ठिकाणी जावून तातडीने पंचनामे करुन  अहवाल पुढे पाठविण्यात आले आहे. ( अभिजीत हिवरकर तलाठी इसांबे )


चौकट :
     काल झालेल्या चक्री वादळामुळे गावातील घरांचे  तसेच समाज मंदिर यांचे नुकसान झाले आहे. सदर पंचनामे झाले असून त्यांची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी ( हरिश्चंद्र वाघे -  ग्रामस्थ - तळवली दांडवाडी )
        

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण