आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या ?शिक्षकांचा तहसीलदार आयुब तांबोळी यांस निवेदन

 पढेगा इंडिया तो बढेगा इंडीया, आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या ?शिक्षकांचा  तहसीलदार आयुब तांबोळी यांस निवेदन





पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
खालापूर :  ८ ऑगस्ट,

            खालापूर तालुक्यातील असलेल्या  रायगड जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांस विद्यार्थ्यांस शिक्षणाव्यतिरिक्त निवडणूक आयोगाकडून  मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ ) या कामाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.हे काम घरोघरी जाऊन या पद्धतीने करायचे असून यासाठी लागणारा वेळ आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असते.एका बाजूनी पढेगा इंडिया तो बढेगा इंडीया नारा दिला जात असून दुसरी कडे मात्र शिक्षकांच्यावर वाढत असलेली जबाबदारी यामुळे आम्हाला विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पुर्ण वेळ द्या असे भावनिक स्वरुपांचे निवेदन तहसीलदार आयुब तांबोळी यांस देण्यात आले.
                   मराठी  शाळा दिवसेंदिवस बंद पडत चालल्या आहेत.मात्र त्या मध्ये ही शिक्षक आपल्या बुद्धीमतेवर पालकांस मराठी शाळेचे महत्व समजावून सांगत आहे.विद्यार्थ्यांना शाळेत घेवून येतांना जणू तारेवरची कसरत करावी लागत असते.मात्र यासाठी पालक वर्ग सुद्धा काही वेळा सकारात्मक विचार करून पाठवित असतात.मात्र शिक्षकांच्या वाढत जात असलेली जबाबदारी यामुळे मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होवू नये यासाठी शिक्षक सेनेकडे धाव घेवून तालुका अध्यक्ष जितेंद्र ठाकूर,महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुभाष राठोड व यांच्यामाध्यमातून या कामातून मुक्त मिळावे म्हणून विनंती करण्यात आली.
               या कामातून शिक्षकांना कसे मुक्त करता येईल व पर्यायी व्यवस्था कोणती वापरता याबाबत मान. गटविकास अधिकारी खालापूर यांच्या सोबत शिक्षक वर्गांनी चर्चा करुन योग्य ते सहकार्य करण्यांचे अश्वासन देण्यात आले. यावेळी खालापूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यारत असलेल्या शिक्षकांना परिस्थितीत शाळाबाह्य सर्वे, नवभारत साक्षरता अभियाननिरीक्षर सर्वे सोबतच यु-डायसची कामे,शाळांची कामे,विज्ञान प्रदर्शन,आर टी आय नुसार मुलांना पूर्णवेळ शिक्षक शाळेत उपस्थित राहण्याची अट कायम असताना आरटीआय २४  अ नुसार शिक्षकांना शाळाबाह्य कामे न देणे असे तरतूद असताना सुद्धा खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांना निवडणुकीची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी जे जबाबदारी देऊन,त्यात सतत कार्यालयाकडून दबावाला बळी पडत जावे लागत असल्यामुळे मुले कशी शिकणार असा प्रश्न सध्या शिक्षक वर्गांना पडत आहे.




Post a Comment

0 Comments

स्वच्छता विषयी पथनाट्य,राजिप शाळा वडगांव यांचा स्तुत्य उपक्रम