गोपाळकाला च्या उत्सवाच्या निमित्ताने भानंग गाव ४० वर्षांनी एकत्र, वै-यांची भावना संपली,गावात आनंदाचे वातावरण

 गोपाळकाला च्या उत्सवाच्या निमित्ताने भानंग गाव ४० वर्षांनी एकत्र, वै-यांची भावना संपली,गावात आनंदाचे वातावरण 




पाताळगंगा न्यूज (  कृष्णा भोसले )
तळा : ८ सप्टेंबर,


                   तळा तालुक्यातील भानंग गाव हे अनेक वर्षे गटातटात विभागला गेला होता.परंतु यावर्षी सर्व मतभेद विसरून ४० वर्षानी गावकरी एकत्र येत या वर्षीचा गोविंदा पथक गावातुन एकत्र येत,वै-यांची भावना संपवून पुन्हा एकत्र आल्यामुळे या गावामध्ये सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
               

   यामध्ये भानंग ग्रामविकास मंडळ मुंबई अध्यक्ष नथुराम दगडु वाघरे व त्यांचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मंडळ भानंग स्थानिक अध्यक्ष काही भागोजी विचारे व त्यांचे सर्व पदाधिकारी यांचे संकल्पनेतून यावर्षी एकत्रित गोविंदा खेळविण्यात आला या संकल्पनेचा आदर राखत गावातील तरुण मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले. त्यामुळे गावात आनंदाचे वातावरणात निर्माण झाले आहे. 
                    यावर्षी गोविंदा पाहण्यासाठी गावातील आबालवृद्ध, महीला, युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.गावातील वयोवृद्ध माणसांनी सुद्धा हा गोविंदा डोळे भरून यावे यासाठी व्हिडिओ च्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहचविण्यात आले.गावाच्या विकासासाठी प्रत्येक जण ऐकत्र येत असेल तर गावाचा विकास होवून,गावाच्या एकीचे दर्शन घडत आहे. गावाच्या एकीसाठी  टाकलेले हे पाऊल भविष्याची एकात्मता वाढण्यांस मदत होइल  आहे.या गावामध्ये विविध धर्माचे नागरिक राहत असून या कार्यक्रमात विलीन झाले होते. एकंदरीत गाव एकतेच्या या टाकलेल्या पाऊलाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे

Post a Comment

0 Comments

स्वच्छता विषयी पथनाट्य,राजिप शाळा वडगांव यांचा स्तुत्य उपक्रम