आंबिवली येथे नविन ट्रान्सफार्मर बसविल्यानें,वीजप्रवाह सुरळीत,लोकनियुक्त सरपंच दीपाली नरेश पाटील सह सदस्य यांचा पुढाकार

 आंबिवली येथे नविन ट्रान्सफार्मर बसविल्यानें,वीजप्रवाह सुरळीत,लोकनियुक्त सरपंच दीपाली नरेश पाटील सह सदस्य यांचा पुढाकार 



पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
आंबिवली : ६ जुलै,

                        आंबिवली गावातील बस स्टॉप येथे असलेल्या ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाल्यामुळे गेले अनेक दिवस वीजपुरवठा खंडीत होत होता,त्याच बरोबर यांचा मानसिक त्रास येतील ग्रामस्थांना सहन करावा लागत होता.सदर ग्रामस्थांच्या समस्यां विचारांना घेता ग्रुप ग्राम पंचायत माजगाव थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच दीपाली पाटील त्यांचं समवेत विद्यमान सदस्य यांनी पुढाकार घेत काल या ठिकाणी नवीन ट्रान्सफार्मर बसवून वीजपुरवठा सुरळीत केला.
                                 आंबिवली गावामध्ये जुन्या ट्रान्सफार्मर मुळे विजेचा प्रवाह कमी अथवा जास्त होल्टेज मध्ये येत होता.त्याच बरोबर सातत्याने वीजपुरवठा खंडीत होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास येत होते.मात्र ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेवून खालापूर येथील अभियंता मुंढे,एमएसबी चौक अभियंता अभिजित बोधनकर आणि यांच्या शी सातत्याने संपर्क करून त्यांनी या ठिकाणी नवीन विजेचा ट्रान्सफार्मर बसविण्यात आला.त्याच बरोबर वीज ग्राहक यांच्या काही समस्या निर्माण झाल्यांस त्या तातडीने मार्गी लावण्यांचे आश्वासन देण्यात आले.
                 ग्रामस्थांच्या समस्यां सोडविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असून या उद्दात विचारांतून ग्रुप ग्राम पंचायत लोकनियुक्त सरपंच दीपाली नरेश पाटील,ग्रामसेवक संदीप धारणे,तसेच मा. उपसरपंच राजेश शिवराम पाटील,सदस्या - प्रांजळ प्रदिप जाधव,पुनम प्रकाश जाधव,सरिता कमलाकर वाघे,अर्पणा यशवंत शिंदे,वैशाली नितीन महाब्दी,वंदना सुधाकर महाब्दी,सदस्य  -शशिकांत गजानन पाटील,मधुकर नारायण गायकवाड यांनी सातत्याने सहकार्य करून वीज पुरवठा सुरळीत केल्यामुळे येथील ग्रामस्थांने सरपंच सह सदस्य यांचे आभार मानले जनतेच्या समस्या साठी सदैव तत्पर असल्यांची प्रतिक्रिया,रमेश जाधव,मंगेश पाटील यांनी पाताळगंगा न्यूज शी बोलतांना व्यक्त केला. 

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण