बाळाराम कान्हु काठावले यांचे अल्पशा आजारांने निधन
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
माजगांव / आंबिवली : ६ जुलै,
खालापूर तालुक्यातील माजगावात राहणारे ह.भ.प.कै. बाळाराम कान्हु काठावले यांचे राहत्या घरी दि.०२/०७/२०२४ जुलै,रोजी अल्पशा अजाराने निधन झाले.ते वयाच्या ७० वर्षाचे होते.त्यांच्या अंत्यविधीस सामाजिक,राजकीय आशा विविध स्तरातील मान्यवर त्यांच्या अंत्य दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते. त्यांचा मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी अनेक माणसे जोडली गेली.सर्व समाजामध्ये ऐक्यांचे,बंधुत्त्वाचे,शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण होण्याकरता ते सतत प्रयत्नशील असायचे. ईश्वर भक्ती वर मोठी श्रद्धा होती.अशी व्यक्ती सोडून गेल्यांने त्यांच्या कुटुंब आणि ग्रामस्थ यांच्या वरती शोककला पसरली आहे. त्यांचे दशक्रिया विधी गुरूवार दिनांक ११/०७/२०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता श्री क्षेत्र धाकटी पंढरी साजगाव येथे करण्याचे ठरविले आहे,तर उत्तरकार्य रविवारी १४/०७/२०२४ दिनांक रोजी माजगांव येथे त्यांच्या निवास स्थानी होणार असून या निमित्ताने ह.भ.प.अनंता महाराज कार्ले (आण्णा) रायगड भूषण, महाराष्ट्र भूषण मु.नविन पोसरी यांचे सकाळी १० वाजता प्रवचन होणारा आहे.त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा प्रमोद बाळाराम काठावले,रविंद्र बाळाराम काठावले,रमेश बाळाराम काठावले,तसेच भाऊ बहिणी,सुना ,नातवंडे ,पंतवडे ,जावई, असा मोठा परिवार आहे.
0 Comments