शेतक-यांची सांड पाण्यामुळे शेती नापिक,पत्रव्यवहार करुन दुर्लक्ष,५ जूनला शेतकरी बांधव सह यशवंत सकपाळ घेणार फाशी
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
चौक : ३० मे,
ग्रुप ग्राम पंचायत चौक तथा सरनोबत नेताजी पालकर यांचे जन्म गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या अश्या या ठिकाणी चौक,तुपगांव,पाली खुर्द,या शेतकरी आपल्या जमीन या सांड पाण्यापासून वाचविण्यांसाठी शासकीय उंबरठे तसेच अनेक वेळा पत्रव्यवहार व उपोषण करुन सुद्धा पदरी निराशा शिवाय काही पडत नाही २६ जानेवारी ला खालापूर येथे उपोषण केले असतांना ग्रुप ग्राम पंचायत चौक,पंचायत समितीने या तीन महिन्यात प्रकल्प उभा करुन कायम स्वरुपी तोडगा काढण्यांचे आश्वासन दिले मात्र ते पुर्ण न केल्यामुळे ५ जून ला आम्ही पंचायती कार्यालया समोर फाशी घेणार असल्यांचे यशवंत सकपाळ यांनी जहिर केले.
सदर सकपाळ शेतकरी हे टोकाचे पाउल उचलत असतांना ग्राम पंचायतीचे धाबे दणाणले असून आज तातडीने विषेश सभा आयोजित करण्यांत आली तसेच शेतकरी वर्गांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावे असे सांगण्यांत आले.आम्ही मंगळवारी इंजिनियर यांस बोलवून पाहणी करु असे आश्वासन देण्यांत आले.मात्र आमच्या जमीनी नापिक होत असतांना आम्ही खायाचं काय असा प्रश्न यावेळी निर्माण केला.नैसगिक नाल्याला गटारांचे स्वरुप प्राप्त झाल्यामुळे,डासाची निर्मिती होत असून येथिल नागरिकाच्या आरोग्याच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मात्र प्रत्येक वेळी आम्हा शेतकरी बांधवांस काम पुर्ण करुन तुमच्या समस्या मार्गी लावू असे आमिश दाखवून शेतकरी वर्गांची मोठी फसवणूक करीत आहे. सदर अनेक ठिकाणी पत्र व्यवहार केले. ग्रुप ग्राम पंचायत नेहमी नागरिकांच्या समस्या अथवा विविध माध्यमांचा दुवा असून ते सोडविण्यांसाठी तप्तर असते.मात्र येथिल बिल्डर च्या सहमताने या परिसरात सध्या घाणींचे गटारांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.मागील दोन वर्षापासून या होणा-या त्रासापासून सुटका करावी,शेती नुकसान टाळावे,नैसर्गिक नाल्यांला गटारांचे स्वरुप मिळू नये यासाठी सातत्यांने निवेदन देवून सुद्धा चौक,तुपगांव पाली (खु.) येथिल ग्रामस्थांना केराची टोपली दाखविली जात आहे.यामुळे संतप्त झालेले यशवंत सकपाळ शेतकरी बांधव सह ५ जून ला फाशी घेणार असे जाहीर केले.
------------चौकट------------
गेले दोन वर्षे या परिसरातील शेतकरी या सांडपाण्यांच्या संदर्भात आवाज उठवित आहे.नैसगिक नाल्याला गटाराचे स्वरुप प्राप्त करु आमच्या जमीनी नापिक होत चालल्या आहेत.यासाठी आम्ही शेतकरी अनेक वेळा उपोषण,आंदोलन केले,मात्र सातत्याने ग्राम पंचायत आश्वासन देत असून आम्हा शेतकरी बांधवांची फसवणूक करीत, असल्यामुळे माझे शेतकरी बांधव व मी ५ जून ला पंचायत कार्यालय समोर फाशी घेणार असल्यांचे अनेक ठिकाणी पत्रव्यवहार करुन नमूद केला आहे.
पिडीत शेतकरी चौक - यशवंत सकपाळ
0 Comments