कर्जत तालुक्यात धक्कादायक प्रकार उघडकीस, शेकडो गाईंची कत्तल!

 


अजय गायकवाड : प्रतिनिधी
कर्जत/नेरळ : ३  मार्च,
          
              नेरळ मंमदापूर आणि दामत ग्रामपंचायत हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला एकाच ठिकाणी गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांचा मांस विकण्यात आल्यानंतर त्यांची कातडी ही एका ठिकाणी टाकण्यात आली आहे,शंभर हुन अधिक गोवंशीय जनावरांची या ठिकाणी कत्तल केल्याचे दिसत आहे.हा धक्कादायक प्रकार पाताळगंगा न्यूजचे प्रतिनिधींने समोर आणला.


            कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मंमदापूर आणि दामत ग्रामपंचायत हद्दीला लागून असणाऱ्या मोकळ्या जागेत शेकडो गाईंची कत्तल करण्यात आल्याचे दिसून येत आहे,या ठिकाणी गाईचे मांस विक्री साठी काढून घेतल्यानंतर वरची कातडी ही एकाच ठिकाणी टाकण्यात आल्याचे चित्र आहे.१००  हुन अधिक गाई मारल्याचे हे भयाण चित्र समोर आल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.उघड्यावर गाईची कातडी टाकून दिल्याने हा प्रकार समोर आला,
            आजवर अशा अनेक गाई मारून टाकल्याचे ह्या भयाण चित्रावरून आपण अंदाज लावला जावू शकतो.याच परिसरात आजवर गोवंशीय जनावरांची हत्या केल्या प्रकरणात दामत गावात अनेक जणांची नावे समोर आली होती,त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आले आहेत.परंतु आता याच परिसरात मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरांची कत्तल होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आलं आहे.त्यामुळे यावर आता पोलीस प्रशासन काय कारवाई करते हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


      एकूणच महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये गोवंश हत्या बंदी कायदा लागू आहे . देशी गाई आणि देशी बैलांचं संवर्धन करण्यासाठी आणि त्यांना कत्तलखान्यापासून वाचवण्यासाठी हा कायदा लागू केल्याचा दावा या राज्यांकडून केला जातो. परंतु केंद्र सरकारच्या अॅनीमल हसबंडरी विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार ज्या राज्यांमध्ये हा कायदा लागू आहे तिथल्या गाई आणि बैलांची संख्या सर्वात वेगाने कमी झाली आहे. याच्या उलट ज्या राज्यांमध्ये गोवंश हत्या बंदी कायदा लागू नाही त्या राज्यांमध्ये मात्र गाई आणि बैलांची संख्या वाढल्याचं केंद्र सरकारच्याच आकडेवारीवरून दिसून आले होते.यामुळे गोवंश हत्या बंदी कायदा केल्याने खरंच जनावरांचे जतन होतय का असा प्रश्न उपस्थित होतोय नाहीतर या सरकारच्या जागी खरोखर योगी सरकारची अवशक्यता असल्याचे गोवंशीय प्रेमीकडून बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments

बांधकामंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त चौकमध्ये रक्तदान शिबिर, सरपंच रितू ठोंबरे यांनी केले रक्तदान