तांबाटी येथील ओके प्रिंट अँण्ड पॅक कंपनीतील माथाडी कामगारांचे बेमुदत आमरण उपोषणाला अखेर स्थगिती - कंपनी प्रशासन नरमले

 तांबाटी येथील ओके प्रिंट अँण्ड पॅक कंपनीतील माथाडी कामगारांचे बेमुदत आमरण उपोषणाला अखेर स्थगिती - कंपनी प्रशासन नरमले



समाधान दिसले  (पाताळगंगा न्यूज )
खालापूर : २८ ऑगस्ट,

                तांबाटी येथील ओके प्रिंट अँण्ड पॅक कंपनीतील माथाडी कामगारांनी अन्याय होत होता, त्यामुळे कामगार संताप व्यक्त करीत होते, तर ५०  किलो पेक्षा जास्तीचे वजन उचलवणे अमानवीय आहे. कामगारांना कंपनीच्या आवारामध्ये बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच अत्यावश्यक सेवा या कंपनी व्यवस्थापनाच्या मुजोरपणाच्या विरोधात माथाडी कामगारांनी बुधवार दि. २३  आँगस्ट रोजी पासून बेमुदत आमरण उपोषण कंपनीच्या गेट समोर सुरू केले होते. तर येथील कामगारांच्या बाजूने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाराष्ट्र जनरल श्रमिक कामगार संघ ठाम राहिली असता अखेर कंपनी प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत सर्व मागणी पूर्ण केल्याने २५  ऑगस्ट रोजी दुपारी ३  वाजता कामगारांच्या आमरण उपोषणाला अखेर स्थगिती देण्यात आल्याने कामगारांनी आनंद व्यक्त करत कामगार एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत समाधान व्यक्त केले.
                 यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, महाराष्ट्र जनरल श्रमिक कामगार संघ मुख्य सल्लागार कैलास म्हात्रे, लेबर ऑफिसर गौरव नालीदे, धातू व कागद बाझार आणि दुकाने माथाडी कामगार मंडळ निरीक्षक संजय गायकवाड, ओके प्रिंट अँण्ड पॅक कंपनीचे पियुश नालकाडे, महाराष्ट्र जनरल श्रमिक कामगार संघ अध्यक्ष नंदकिशोर मयेकर, खजिनदार विलास कदम, सरचिटणीस सुप्रीम सुर्वे, चिटणीस अंकुश भागित, जयानद सावंत, चिटणीस कैलास फराट, कोकण विभाग अध्यक्ष समीर चव्हाण, रायगड जिल्हाध्यक्ष संतोष देशमुख, युवासेनेचे उपजिल्हा अधिकारी निखिल पाटील, तालुका अधिकारी महेश पाटील, विभागप्रमुख अशोक मराजगे, संगम जाधव, प्रणाल लाले, अंकुर बामणे, विशाल म्हामुनकर, कैलास पाटील आदी प्रमुखासह खालापूर तालुक्यातील नागरिक व कामगार उपस्थित होते.
                   तर प्रवीण फराट, प्रतीक फराट, अजित ठोंबरे, जयेश मगर, सुरेश भडकले, यशवत मुंडे, राजेश पाटील हे सात कामगार उपोषणासाठी बसले आहे.तांबाटी गावाच्या हद्दीत ओके प्रिंट अँण्ड पॅक कंपनी आहे. कंपनीत ७  स्थानिक माथाडी कामगार काम करीत आहेत. ५०  किलो पेक्षा जास्तीचे वजन उचलवणे अमानवीय आहे. कामगारांना कंपनीच्या आवारामध्ये बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच अत्यावश्यक सेवा बंद केल्यामुळे महाराष्ट्र जनरल श्रमिक कामगार संघाने वारंवार माथाडी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करीत असतानाच कंपनी व्यवस्थापक दुर्लक्ष करीत होते.
                    कंपनी व्यवस्थापनाच्या मुजोरपणाच्या विरोधात माथाडी कामगारांनी बेमुदत आमरण उपोषण  कंपनीच्या गेट समोर २३  आँगस्ट रोजी पासून सुरू केले होते, या उपोषणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाराष्ट्र जनरल श्रमिक कामगार संघाने पाठिंबा देत कंपनी प्रशासनाला धारेवर धरले असता अखेर कंपनी प्रशासनाने नरमाई घेत कामगारांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्याने २५ ऑगस्ट रोजी दुपारी ३  वाजता कामगारांच्या बेमुदत आमरण उपोषणाला स्थगिती देण्यात आल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण