राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त रायगडात जन स्वराज्य यात्रा सुरू,

 राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त रायगडात जन स्वराज्य यात्रा सुरू,

लोकांचा वाढता पाठिंबा पक्षाच्या आगामी वाटचालीसाठी महत्वाची बाब.... भगवान ढेबे 



हनुमंत मोरे ( पाताळगंगा न्यूज )
खोपोली / वावोशी : २६ ऑगस्ट 

         राष्ट्रीय समाज पक्षाचा २९ ऑगस्ट रोजी २० वा वर्धापनदिन असल्याने यानिमित्ताने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी जन स्वराज्य यात्रा सुरू करण्यात आली आहे.या यात्रेचा शुभारंभ तळ कोकणातून करण्यात आला असून या यात्रेला लोकांचा मिळत असलेला पाठिंबा पाहून समाधान वाटत आहे.या यात्रेच्या निमित्ताने ज्या ज्या ठिकाणी आमचे जाणे झाले त्या सर्व ठिकाणी लोकांचा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वाटचालीसाठी मिळालेल्या शुभेच्छा व पाठिंबा पाहता ही बाब पक्षाच्या आगामी वाटचालीसाठी महत्वाची ठरणार असल्याचे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे कोकण प्रदेश विभागीय अध्यक्ष तथा पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य भगवान ढेबे यांनी व्यक्त केले आहे.
           
   
             राष्ट्रीय समाज पक्षाचा विसावा वर्धापनदिन येत्या २९ऑगस्ट रोजी पुणे येथील गणेश कला- क्रीडा मंचावर आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाला संपूर्ण देशातील राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठीच्या सुचना पक्षाकडून कार्यकर्त्यांना देण्यात आल्या असून त्या सुचनेनुसार कोकण प्रदेश विभागीय अध्यक्ष तथा राज्य कार्यकारिणी सदस्य भगवान ढेबे यांनी तळ कोकणातून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.

             त्यांच्या या दौऱ्याला कार्यकर्त्यांचा उत्फुर्द 
प्रतिसाद मिळताना दिसत आहे.त्यांनी नुकतीच रायगड जिल्ह्यातून जन स्वराज्य यात्रेला सुरुवात केली असून रायगडात ही त्यांच्या यात्रेला कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.पक्षाच्या पुणे येथील वर्धापनदिन कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातून दहा हजार कार्यकर्ते जाणार असल्याचे भगवान ढेबे यांनी सांगितले.कोकणातून सर्वाधिक कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील अशी व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण