आत्करगाव ग्रामपंचायतवर संदीप पाटील यांची एकहाती सत्ता, सरपंचासह ८ सदस्य आणले निवडून ....राष्ट्रवादीचा दारुण पराभव .....
पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : ६ नोव्हेंबर,
खालापूर तालुक्यातील अतिशय प्रतिष्टेची असलेल्या आत्करगाव ग्रामपंचायत वर शेकापचे तालुका चिटणीस संदीप पाटील यांचे पुन्हा वर्चस्व सिद्ध झाले असून ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच पदी शर्मिला नितीन भोईर यांच्यासह ८ सदस्य निवडून आल्याने संदीप पाटील यांची एकहाती सत्ता आली आहे,
या ग्रामपंचायत मध्ये शेकापचे संदीप पाटील आणि शिंदे गट यांनी मिळून एकता ग्रामविकास आघाडी करून शर्मिला नितीन भोईर यांना थेट सरपंच पदाची उमेदवारी दिली होती तर राष्ट्रवादी (अजित दादा गट) यांनी सतूआई माता ग्रामविकास आघाडी पॅनल करून रोहिनी संदेश मढवी यांना थेट सरपंच पदाची उमेदवारी दिली होती ,यात दोन्ही पक्षांनी जोरदार ताकद लावली असून या निवडणुकीत शर्मिला भोईर यांनी भरघोस मते घेऊन विजयी झाल्या आहेत तर नऊ सदस्यांपैकी आठ सदस्य निवडून आले आहेत यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचा दारुण पराभव झाला आहे,
त्यामुळे शेकापचे संदीप पाटील यांची पुन्हा एकदा या ग्रामपंचायतवर एकहाती सत्ता आणून वर्चस्व सिद्ध झाले आहे,
0 Comments