सहज सेवा फाऊंडेशन चा स्तुत्य उपक्रम,नववर्षानिमित्ताने नदी संवर्धन,दिवे लावून,रोषणाई ठरली लक्षवेधक

 सहज सेवा फाऊंडेशन चा स्तुत्य उपक्रम,नववर्षानिमित्ताने नदी संवर्धन,दिवे लावून,रोषणाई ठरली लक्षवेधक  







पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
खोपोली : २ जानेवारी,


              खोपोली शहरातून वाहणारी पाताळगंगा नदी,जिच्यामुळे नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.संपूर्ण तालुक्यात औद्योगिक करणांचे जाळे पसरले आहे.यामुळे विकास झाला आहे.तसेच नागरी जीवन सुखकर होत असल्यामुळे,विकास होत आहे. मातृतुल्य असणार्‍या या मातेची योग्य ती काळजी जनतेने घ्यायला या उद्दात विचारांतून,सहज सेवा फाऊंडेशन च्या माध्यमातून पाताळगंगा नदी कृतज्ञता व पूजन उत्साहात करण्यात आले.खोपोली येथील गगनगिरी आश्रम येथिल समोरील नदी भोवतालचे पटांगण या कार्यक्रम घेण्यात आला.तसेच नदिच्या सभोवताली दिवे लावून नदी प्रती संकल्प करण्यात आला.यावेळी नदीपात्रात केलेली रोषणाई लक्षवेधक ठरली 
               

 नविन वर्षाच्या दिवशी नदी संवर्धन करण्यासाठी उपक्रम,हाती घेण्यात आला.पाताळगंगा नदीचे ऋण मानून भविष्यात  मिळालेल्या या निसर्गाच्या वरदानाचे चांगल्या प्रकारे जतन कसे करता येईल या संदर्भात जागरूकता करण्याचा प्रयत्न सहजसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आला.खोपोली येथील उगम पावणाऱ्या या नदीपात्राबद्दल प्रशासनाने जागृत राहून वाया जाणाऱ्या पाण्याचे जतन केले पाहिजे. या नदीवर शहराच्या सौंदर्यात भर घालणारे सुशोभीकरण राबवायला पाहिजे,यासाठी जनसामान्यात जागरूकता निर्माण करण्यासाठी आपली नदी, आपली जबाबदारी ह्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

             गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यात सातत्यपूर्ण योगदान देणाऱ्या सहज सेवा फाउंडेशनच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे नागरिकांनी भरभरून कौतुक केले.तसेच दर महिन्यात खोपोलीतील विविध नदी घाटावर पौर्णिमेच्या दिवशी पूजन करण्यात येईल असाही संकल्प करण्यात आला.सदर हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहजसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे,उपक्रम प्रमुख हितेश राठोड,दिवेश राठोड, उबेद पटेल, ह्रितिक मयेकर, उपाध्यक्षा इशिका शेलार,सचिव अखिलेश पाटील,खजिनदार संतोष गायकर,जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी,महीला संघटक निलम पाटील,तालुका प्रमुख मोहन केदार,मार्गदर्शक नरेंद्र हर्डीकर,सल्लागार राजेंद्र फक्के,नम्रता परदेशी,बनिता सहा सीमा कोशे,तुषार अगरवाल यांनी अथक मेहनत घेतली. तसेच या कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवली तसेच  आनंद शाळा येथील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नकुल देशमुख यांनी केले.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण