तुकाराम दामू मालकर यांचे अल्पशा आजाराने निधन

 तुकाराम दामू  मालकर यांचे अल्पशा आजाराने निधन 





पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
तळवली : २१ जून,

             खालापूर तालुक्यातील तळवली गावात राहणारे कै.ह.भ.प.तुकाराम दामू मालकर यांचे राहत्या घरी दि. १२ जून रोजी अल्पशा अजाराने निधन झाले.ते वयाच्या ८५  वर्षाचे होते.त्यांच्या अंत्यविधीस सामाजिक,राजकीय आशा विविध स्तरातील मान्यवर त्यांच्या अंत्य दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते.                                                                             त्यांचा मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी अनेक माणसे जोडली गेली.सर्व समाजामध्ये ऐक्यांचे,बंधुत्त्वाचे,शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण होण्याकरता ते सतत प्रयत्नशील असायचे. ईश्वर भक्ती वर मोठी श्रद्धा होती.अशी व्यक्ती सोडून गेल्यांने त्यांच्या कुटुंब आणि ग्रामस्थ यांच्या वरती शोककला पसरली आहे.                                                                       त्यांचे दशक्रिया विधी २१ जून रोजी श्री क्षेत्र उद्धर रामेश्वर येथे झाली. तसेच २३ जून ह.भ.प.दिलीप महाराज राणे यांचे सायंकाळी किर्तन होणार आहे.तर उत्तरकार्य  सोमवार दिनांक २४  जून रोजी तळवली त्यांच्या निवास स्थानी होणार असून या निमित्ताने ह.भ.प. रामदास भाई महाराज पाटील ( गुरुकुल महड )  यांचे सकाळी १० वाजता प्रवचन होणारा आहे.त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा संतोष तुकाराम मालकर,देविदास मालकर,प्रल्हाद मालकर,धृव मालकर,भाऊ  - जयराम मालकर,मधुकर मालकर ,बहिणी,सुना ,नातवंडे ,पंतवडे ,जावई, असा मोठा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण