कमलबाई सखाराम जाधव ह्यांचे अल्पशा आजाराने निधन

 कमलबाई सखाराम जाधव ह्यांचे अल्पशा आजाराने निधन 




 पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
आंबिवली   : १७ जुलै,

             खालापूर तालुक्यातील आंबिवली गावात राहणारी वै.ह.भ.प.कमलबाई सखाराम जाधव यांचे राहत्या घरी रविवारी दि. १३ जुलै, रोजी अल्पशा अजाराने निधन झाले.त्या वयाच्या ६९  वर्षाचे होते.त्यांच्या अंत्यविधीस सामाजिक,राजकीय आशा विविध स्तरातील मान्यवर त्यांच्या अंत्य दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते.                                                                          त्यांचा मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी अनेक माणसे जोडली गेली.सर्व समाजामध्ये ऐक्यांचे,बंधुत्त्वाचे,शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण होण्याकरता ते सतत प्रयत्नशील असायचे. ईश्वर भक्ती वर मोठी श्रद्धा होती.अशी व्यक्ती सोडून गेल्यांने त्यांच्या कुटुंब आणि ग्रामस्थ यांच्या वरती शोककला पसरली आहे.                                                                             त्यांचे दशक्रिया विधी सोमवार दि.२२ जुलै रोजी श्री  क्षेत्र उद्धर रामेश्वर येथे होणार आहे.तसेच त्यांचे उत्तरकार्य गुरुवारी २५ जुलै रोजी ,आंबिवली (माजगांव) त्यांच्या निवास स्थानी होणार असून या निमित्ताने ह.भ.प.रामदास महाराज पाटील खोपोली( गुरुकुल संस्था महड ) यांचे सकाळी १० वाजता प्रवचन होणारा आहे.
           त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा ,मनोहर सखाराम जाधव,राजेश सखाराम जाधव,मुली,बहिणी,सुना ,नातवंडे ,पंतवडे ,जावई, असा मोठा परिवार आहे.




Post a Comment

0 Comments

बांधकामंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त चौकमध्ये रक्तदान शिबिर, सरपंच रितू ठोंबरे यांनी केले रक्तदान