पौध - निगडोली रस्त्याची दुरवस्था,रस्त्यावर खड्डे,व खडी मुळे अपघाताला निमंत्रण
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
पौध : २१ फेब्रुवारी
खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचे ग्रहण केव्हा संपणार असा प्रश्न तालुक्यातील जोडणा-या ग्रामीण भागातील असलेल्या रस्त्यांची झाली आहे.रस्त्यावर खड्डा तसेच खडी मुळे वहान घसरण्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.मात्र या रस्त्याकडे साफ दुर्लक्ष करीत असल्यामुळे पौध - निगडोली या रस्त्यांची अक्षरशा चालन होत असल्यांचे दृश्य या ठिकाणी पहावयांस मिळत आहे.
पावसाळ्यात या ठिकाणी पडलेल्या खड्यामुळे तळावाचे स्वरुप प्राप्त होत असते.परिणामी हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे.या मार्गावरु शाळकरी मुले,वयोवृद्ध प्रवास करीत आहेत.मात्र गेले अनेक वर्ष या कडे दुर्लक्ष करीत होत असल्यामुळे हाच रस्ता प्रवासी वर्गांची डोके दु:खी ठरत आहे.
सदर हा रस्ता दर्जेदार केव्हा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मात्र तालुक्यातील जोडणारा आजही खड्यांचा असल्यांचा पहावयांस मिळत आहे.
0 Comments