रायगड परिक्षेत्रामध्ये १७ ठिकाणी राबविले ‘स्वच्छ जल - स्वच्छ मन

 रायगड परिक्षेत्रामध्ये १७ ठिकाणी राबविले ‘स्वच्छ जल - स्वच्छ मन’ अभियान तर कर्जत जवळील कडाव गावातील तलाव केला स्वच्छ 

 


माय मराठी न्युज :  नवज्योत  पिंगळे 
कर्जत / खालापूर : ३ मार्च,

           परम वंदनीय सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व सत्कारयोग्य आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन आशीर्वादाने २३ फेब्रुवारी २०२५ ची स्वर्णिम प्रभात एक नवीन जागृती व सेवेच्या दिव्य प्रकाशाचा संदेश घेऊन आली ज्यामध्ये ‘अमृत प्रोजेक्ट’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याचे आयोजन विश्वभरात केले गेले आणि त्याबरोबरच दिल्लीतील निरंकारी मिशनच्या ग्राउंड नं ८  येथे एक विशाल सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
                 या अभियानाअंतर्गत रायगड जिल्ह्याच्या खरसई झोन मध्ये एकूण १७ ठिकाणी जलस्रोतांची स्वच्छता करण्यात आली ज्यामध्ये सुमारे २ हजारहून अधिक निरंकारी सेवादल स्वयंसेवक व भाविक भक्तगणांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला.होता तर कर्जत तालुक्यातील मार्केवाडी ब्रँच वतीने कडाव गावातील तलावचा परिसर, संत निरंकारी मिशनच्या सदस्यांनी स्वच्छ केले.
         संत निरंकारी मंडळाचे सचिव व समाज कल्याण प्रभारी जोगिंदर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले, की देशभरात राबविलेल्या ‘अमृत प्रोजेक्ट’ परियोजनेच्या दरम्यान सर्व सुरक्षा मानकांचे पूर्णपणे पालन करण्यात आले. युवावर्गाचा विशेष सहभाग हा अभियानाचा मुख्य आधार होता. त्यांनी हेही सूचित केले, की ही मोहीम केवळ एका दिवसापुरती सीमित नाही, तर दरमहा विविध घाट व जलस्रोतांची स्वच्छता निरंतर चालू राहील.
            संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने, पूज्य बाबा हरदेवसिंहजी यांच्या असंख्य दिव्य शिकवणूकींतून प्रेरणा घेत या पावन अभियानाचे आयोजन करण्यात आले. पूर्वीप्रमाणेच याही वर्षी ‘चला सावरु, यमुना किनारे’ असा उद्घोष करत या अभियानाला आणखी व्यापक स्वरूप देण्यात आले.
            २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील १ हजार ६५० पेक्षा अधिक ठिकाणी १० लाखांहून अधिक संख्येने सेवाभावनेने ओतप्रोत स्वयंसेवक भक्तगणांनी एकाच वेळी हे महान अभियान साकारले. हे दृश्य केवळ प्राकृतिक स्वच्छतेपर्यंत सीमित न राहता, अंतर्मनाला निर्मळ आणि पवित्र करण्याऱ्या एका आध्यात्मिक यात्रेचे सुंदर प्रतीक बनले. प्रत्येक श्रद्धाळु भक्ताची समर्पित उपस्थिती या गोष्टीचे प्रमाण होते, की जेव्हा प्रेम, सेवा आणि समरसतेचा दिव्य संगम होतो तेव्हा प्रकृतीही नवजीवनाचा अनुभव घेते.

Post a Comment

0 Comments

सुकीवली जिल्हा परिषद गटातून प्रशांत आखाडे