विठाबाई विष्णू पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

 विठाबाई विष्णू पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन



माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
खालापूर : ११ जून,

               खालापूर तालुक्यातील ताकई गावात राहणारी वै.विठाबाई विष्णू पाटील यांचे शुक्रवार दिनांक ६ जून रोजी अल्पशा अजाराने निधन झाले.या वेळी त्या ७५ वर्षाच्या होत्या.त्यांच्या अंत्यविधीस सामाजिक,राजकीय आशा विविध स्तरातील मान्यवर त्यांच्या अंत्य दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते.                       
                   त्यांचा मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी अनेक माणसे जोडली गेली.सर्व समाजामध्ये ऐक्यांचे,बंधुत्त्वाचे,शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण होण्याकरता ते सतत प्रयत्नशील असायचे. ईश्वर भक्ती वर मोठी श्रद्धा होती.अशी व्यक्ती सोडून गेल्यांने त्यांच्या कुटुंब आणि ग्रामस्थ यांच्या वरती शोककला पसरली आहे.                                      त्यांचे दशक्रिया विधी रविवार दि.१५ जून रोजी श्री  क्षेत्र पुंडलिक मंदिर साजगाव येथे होणार आहे.तसेच त्यांचे उत्तरकार्य बुधवार दिनांक १८ जून रोजी ताकई येथे त्यांच्या निवास स्थानी होणार आहे.त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा चंद्रशेखर विष्णू पाटील, सुनील विष्णू पाटील, राजेश विष्णू पाटील आणि मुली,बहिणी,सुना ,नातवंडे ,पंतवडे , जावई, असा मोठा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments

संतोष शिंगाडे यांना आरडीसी बॅंक च्या वतीने जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहिर